एक ओहोळ

काटे टोचत नाहीत मला, तुझ्यासाठी चालताना

दु:ख दुखत नाही मला, तुझ्यासाठी सोसताना

अश्रू बोचत नाहीत मला, तुझ्यासाठी ढाळताना

शब्द अडत नाहीत मला तुझ्यासाठी लिहिताना

Dynamic Meditation-1

If it is meditation, how can one ‘be’ dynamic, ’cause meditation is just an observation and understanding.
And if one is dynamic, …doing something…., how can it be called a meditation?

So ‘meditating a dynamic’ is being with something which is active without doing anything…..
But that activity cannot be seen, cannot be experienced. One has to understand, that there is some activity.
So, initially, one tries to really ‘do’ something hard, then one just fails to do anything, even fail to breathe properly, then the things start happening, on there own, without any interfering activity, nature is active on its own.
But at some point, all the causes of this ‘false’ activity also stops, and there remains silence. But that silence is active, that’s why one feels it, if there is no activity, nothing can be felt.

Is it a singularity?

But still, there is NOTHING!
Can this zero state be called DYNAMIC?
Just like a black hole. There is nothing, but there is activity. The TIME is zero.

There is a process of ‘way back to home’. There is nothing to express, nothing to do, nothing to achieve. Can we call ‘black hole’, a pratiprasav?
Does dynamic meditation means, concentrating on zero or being a zero?

 

Being divine and speaking about divinity are two different things.

If a person is divine,he will accept everything and love everything, so he need not to speak about divinity specifically. or whatever, he will speak, it will drench with divinity.

But if someone is specifically speaking about divinity and nothing else, there is a confusion!

Freeeeee………

By taking a deep view at a life, one can find out that everything which is really important to live, is just free!

Giving n taking is just a part of a game, to boost one’s Ego. 😉

As everything is a part of a BIG GAME, we have to participate n give n take. But it is fun!

Again,…. this fun is free! 🙂

 

5D

It’s a five dimensional world! 😉

…while searching……

Pouring all my energy, I am searching for you.

wandering through the space-time curve,

gasping at every point, I found you.

still revolving freely, for you, within you….

Oh my Love, I think, I know you!

******************************************************

‘ Ultimate Truth‘ is always beautiful, and ……..Unreachable:)

******************************************************

The truth is always a relative term. One cannot understand the ultimate truth, and there is nothing which can be called complete falsehood.

So, we always have to bare with the relative reality!

….Kavita

*******************************************************

सबला

‘स्त्री आणी तिची मुक्ती’ अशा विषयावर सध्या चाललेल्या चर्चा वाचून मला राहून राहून एकाच स्त्रीची आठवण होत रहातेय.
माझी आजी. तिचा ‘स्त्रीमुक्ती’ या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे ‘डायरेक्ट मोक्ष’ हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा.
त्यामुळे तिने ना कधी पुरुषांना शत्रू मानले , ना स्त्रियांना. .
……………………………………….

तशी ती मुक्त कधीच नव्हती, पण ती ‘बद्ध’ पण नव्हती.
तिनी कधीही पैसे कमावले नाहीत, पण त्यामुळे ती कधीही दीनवाणी झाली नाही.
तिच्या ९२ वर्षांच्या आयुष्यात तिच्या तोंडून कधीही कुणीही ‘कंटाळा’ हा शब्द ऐकला नाही.

तरी तिच्या एका स्त्रीयांना उद्देशून केलेल्या कवितेतल्या ओळी मला लहानपणी नेहमी खटकायच्या,

जात तुझी चंदनाची, असे झिजू दे ग अंग,
सये! मांडिलीस पूजा, होऊ देई यथासांग …..

जे जे समोर येईल त्याला तोंड देणे, ते मनापासून, उत्तम करणे हे तिला पक्के माहित होते.
तिच्या अशा मृदू आणि लढाऊ अशा दोन्ही गुण दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विचार केल्यावर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की तिनी स्वत:ला पूर्ण ओळखलेले होते, ती कशी आहे, तिला स्वत:ला काय हवय, ती काय करू शकते आणि तिच्या आणि तिच्या संसारातल्या सर्वांच्या संपन्न आयुष्यासाठी तिनी काय करायला हवय याची तिला पूर्ण जाण होती. तिनी तिचे चंदनाचे गुण पूर्ण ओळखले होते.
त्याच कवितेतल्या शेवटच्या ओळी होत्या,

चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी,
जात तुझी चंदनाची, तुझे ‘मी’ पण ना सोडी!

एक स्त्री म्हणून नैसर्गिकरीत्याच व समजव्यवस्थेचा भाग म्हणून, जमवून घेणे, कष्ट करणे, दु:ख सोसणे या गोष्टी वाट्याला येणार हे तिनी गृहीत धरले होते. पण सगळे निभावून नेण्याचे सामर्थ्य देखील स्त्री म्हणूनच वाट्याला आले आहे हेदेखील तिला पक्के माहित होते.कुणासाठीही काही करताना ती नोकर, आया वगरै नसायची, ती ‘दात्री’ होती! ती ”सबला’ होती!

—Kavita….

आज या अथांग उत्तुंग हिमालयाच्या पायथ्याशी येऊन पोचलेय…
पण मला भीती वाटत नाहीये, कसलीच नाही, कधीच वाटली नाही, ना माणसांची, ना संकटांची, ना परिस्थितीची, ना जगण्याची, ना मरणाची!
…………………………………………………………..
ज्याबद्दल कृतज्ञता वाटावी, अशी प्रत्येक गोष्ट अचानक भोगवस्तू कधी ठरली, कळलेच नाही.
राज्यसत्ता ही उत्तरदायित्व ना ठरता उपभोग्य ठरली,
भूमाता आणी स्त्री आदरणीय ना ठरता उपभोग्य ठरल्या!
तो फक्त माझाच नाही, माझ्याच कुळातल्या अनेक मातांचा देखील अपमान होता.
सृजनशक्तीचा असा अपमान होऊ शकतो, असे खरेच कधी वाटले नव्हते….
‘त्या’ सोळाहजार जणींचे दु:ख एकाच वेळेस अंगावर कोसळले.
………………………………………………….
माझ्याकडे पाहताना त्याच्या नजरेतून उतरलेले ते कारुण्य आणी त्यानंतर माझ्या जीवनातली सगळीच आसक्ती जाळून टाकणारे ते त्याच्या डोळ्यातले वैराग्य.
…………………………………………………………..
आज या इथे अचानक पायातले त्राण संपले, आणि मनानी सुटकेचा श्वास सोडला.
…आता मात्र नक्की संपतोय हा प्रवास.
आता फक्त आठवणीत तडफडणे संपेल….
हा यज्ञ संपेल, ही याज्ञसेनी संपेल, फक्त राख उरेल मागे.
मी मात्र मोकळी होईन….त्याच्याभोवती फेर धरायला.

संमोहन

संमोहन शास्त्राबद्दल थोडेसे…
संमोहन म्हणजे अंतर्मनाची शक्ती वापरून बाह्यमनाला ‘वळवणे’.
………………………..
स्व-संमोहन करताना, आधी मनातले random  विचार थांबवून, कमी करून मग स्वतःला सुचना घेता येतात.
पण, काही गोष्टींसाठी दुसर्या कुणाकडूनच सूचना घेणे योग्य असते. उदाहरणार्थ, एखाद्या गोष्टीचे भीती घालवण्यासाठी, स्वतःच्या स्वतःला सूचना घेणे शक्य नसते..

…………………………….

संमोहनाच्या ३ पातळया असतात. 1.light, 2.middle, 3.deep.
पहिल्या पातळीत असताना माणूस बराचसा जागाच असतो, फक्त डोळे घट्ट   मिटलेलेच राहतात. अंग जड असते. पण नीट बोलता येत असते.

next >>>>

तर ‘विपश्यना’ (Vipassana)……,
या ध्यान प्रकारात जी मुख्य गोष्ट करायची ती म्हणजे, अंतर्मुख होणे.
( थोडक्यात घरातला साठवलेला कचरा उपसून बघणे, बघायला लागला कि तो आपोआप स्वच्छ होतो, …मग ‘दिवाळी’ येतेच पाठोपाठ!)
“आत बघणे, शरीरातील घडामोडी बघणे,कारण जे पिंडी तेच ब्रम्हांडी, त्याच त्या पाच महाभूतांपासून संपूर्ण विश्व बनले आहे, आपण त्याचाच भाग आहोत, त्यांचे नियम सगळीकडे सारखे. ते ‘केवळ’ बघायचे! निसर्ग, आयुष्य, स्वत: , इतर,…. सगळेच ‘नक्की काय चाललंय’ ते समजून घेण्यासाठी हे अंतर्मुख होणे असते….”
…तर कोर्स सुरु झाला. नियम सांगितले, ‘आर्य मौन’ पाळायचे. खाणाखुणा सुध्धा करायच्या नाहीत. काही गरज पडली तर धम्मसेविका असते, तिला काय ते सांगा. सकाळी ४ ते रात्री ९ पर्यंतचे शेड्युल सांगितले. एकंदरीत १२ तास ध्यान करायचे. ( अरे देवा, कुठे येऊन पडले?! ) मला मौन पाळणे काही फार कठीण वाटले नाही. मला बाजूच्या अखंड पचर पचर करणार्‍या २ बायकांची मात्र काळजी वाटत होती…………………..

हळूहळू पाठ भयंकर दुखायला लागली, सायटिका, स्पोंडीलायटिस वगरै सगळे प्रकार डोके वर काढायला लागले.मग अचानक लक्षात आले, कधीतरी काही वेळ श्वासाकडे लक्ष देताना, उगीच घाम वगरे येत नाहीये, मुन्ग्यापण येत नाहीत. म्हणजे मन स्थिर झाले कि शरीर आपोआपच स्थिर होतेय, त्यासाठी वेगळे काही प्रयत्नांचे पराकाष्ठा वगरै करायची गरज नाही. उगीच मारामारी करतेय मी स्वतःशीच. गुरुजी सांगत होते, फक्त नाकाच्या आतल्या त्वचेकडे लक्ष द्या, तिथे श्वासाचे जाणीव “बघा”.
अचानक हे सगळे जमायला लागले… हुश्श केले मी. ( अर्थात काही ‘सेकंद’ जमत होते, पुन्हा माकडचाळे सुरु!)
आताही संवेदनाच पहायच्या होत्या, पण आता डोक्यापासून सुरु करून हळूहळू एक एक करत पायापर्यंत जायचे. गुरुजी सगळेच सोप्पे करून सांगत होते. काही जाणवत नसेल तर आधी फक्त त्वचेला होणार्‍या संवेदानांकडे लक्ष द्या. कपड्याचा स्पर्श, मधूनच येणार्‍या वार्‍याचा स्पर्श हे बघा.कपड्याचा स्पर्श, वाहत्या हवेचा स्पर्श प्रत्येक वेळेस कित्ती वेग-वेगळा असतो, आपले स्वत:चे तापमान कसे बदलते, या गोष्टी कधी पाहिलेल्याच नसतात.शरीरातले रस आणी त्यांची धावपळ ‘दिसायला’ लागली. मनात विचार आला, काही काम ना करता नुसती स्थिर बसलेय तरी इतकी खळबळ-हलकल्लोळ इ. प्रकार जाणवतायत. एरवी आपण एकाच वेळेस १७६० उद्योग करत असतो. त्यावेळेस तर कित्त्तत्त्ती गोंधळ सुरु असेल, त्यामुळे फुटून कसे काय नाही जात शरीर?
‘च्यायला, काय सिस्टीम बनवलीये निसर्गानी! इतकी कॉम्प्लीकेटेड, तरीही कॉम्पॅक्ट आणी युजर फ्रेंडली देखील!’

……………………..
आजपासून ‘द्रष्टा’ भावनेची खरी परिक्षा सुरु!
आता मन सतत वरपासून खाल पर्यंत, पुन्हा खालपासून वरपर्यंत फिरवायची ‘राईड’ सुरु करायची होती.
गुरुजी आता गौतम बुद्धाबद्दल सांगत होते, की त्यानी असेच अंतर्मुख होऊन, विपश्यना (Vipassana) करून, सर्व संस्कार -विकार शोधून काढले, आणी याच पद्धतीनी नष्ट केले.
अत्यंत खोल-सूक्ष्म जाणीव निर्माण झाल्यानंतर त्यांना दिसले, की सतत- आपली डोळ्याची पापणी लावते तितक्या काळात, शत कोटी सहस्त्र वेळात ‘कण’ निर्माण होऊन नष्ट होतात.
हाच निसर्गाचा मूळ नियम. ( मी थक्क झाले, आणी गौतम बुद्धाला शत कोटी सहस्त्र वेळा साष्टांग नमस्कार घातला!)

…………………………………………
सहज बाहेर फिरताना एकदम लक्षात आले, ‘अरेच्चा, इथे पिंपळाचे झाड आहे, कित्ती सुंदर आहे! इथे निदान १७-१८ प्रकारची फुलपाखरे आहेत, तितक्याच प्रकारची रानफुले पण आहेत. मी काय बघत होते ५ दिवस?’ खरोखरच आपली फक्त नजर फिरते, आपण ‘पहिले’ काहीच नसते. मग मी अजून जरा बाहेर रेंगाळले, ४ मिलीमीटर लांबीच्या निळ्या निळ्या कळ्या दिसल्या, २ मिलीमीटर व्यासाची लालचुटुक रानफुले दिसली. पांढरीशुभ्र फुलपाखरे पहिली. प्रत्येक पावलाला ‘अरेच्चा’ सुरु झाले. खरोखरच सगळ्या जाणीवा तीव्र झाल्याच्या जाणवत होत्या. प्रत्येक पावलाला, आजूबाजूच्या रानातल्या पानांचे वेगळे वेगळे वास जाणवत होते. अचानक नवीन पृथ्वीवर आल्यासारखे वाटत होते.  पुढच्या दिवशी असाच पुन्हा ‘अरेच्चा’ चा एपिसोड सुरु झाला. सगळे अजूनच नवीन वाटायला लागले. आत आणी बाहेरदेखील. चादर नवीन, blanket नवीन, तोच जुना पंचा नवीन… सगळेच नवीन, वेगळे! इतकी गम्मत मला पूर्वी कधीही कशाचीही वाटली नव्हती.

………………………

एकंदरीत अधिष्ठान आणी ध्यान (Vipassana) बरे जमायला लागले होते. पण ‘खरे ध्यान’ काही सेकंदच. परत मनातून वेगवेगळे विचार उसळी मारायचे. अजूनही कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उसळणे सुरूच होते. पण आता फरक म्हणजे, मी सिनेमा पहिल्यासारखी त्या बघत होते. आणी गम्मत म्हणजे ज्या आठवणींचा पूर्वी खूप त्रास व्हायचा, त्या ‘सिनेमात’ आता मात्र मीच ‘व्हिलन’ ठरत होते! मनात म्हटले, ‘बरोबरच आहे, शेवटी व्हिलनच मार खातो! त्याला त्रास होणारच.’ आता मात्र धडा घ्यायचा, ‘जागे’ राहायचे.

………………………………………….

मात्र या सगळ्यातून मला कुठल्याही व्याख्येत ना बसवलेला एक ‘सत्य धर्म’ सापडला. प्रत्येक जण वेगळा, प्रत्येकाचा ‘धर्म’ वेगळा. जे जे करून माणसाला अधिक ‘माणुसकी’ सापडेल, करूणा निर्माण होईल, तो तो त्याचा धर्म. कुणाला जपजाप्य करून, कुणाला प्रार्थना करून, कुणाला समाजसेवा करून, कुणाला जगभर हिंडून, कुणाला ज्ञान मिळवून,.. जी गोष्ट करून मन शांततेनी, समाधानानी, आनंदानी भरून जाईल, तो तो त्याचा ‘खरा धर्म’. आणी ज्या आनंदात ‘कुणालाही’ बिनबोभाट सामील करून घेता येईल, तो ‘खरा आनंद’.
‘भवतु सब्ब मंगल’.

===============================

‘result oriented’

-Kavita…….